if (typeof document.onselectstart != "undefined") { document.o

शनिवार, २८ सप्टेंबर, २०२४

भामा

 तुझ्या प्रीतीने वेडी होऊन धावते रे देवा,

दर्शनाने कृतार्थ करा या वेड्या जीवा.

घेऊनी उडी सह्यद्री शिखरावरुनी,

 व्हळ होऊनी नीर रूपाने आले तव चरणी,

देवा आले तव चरणी.

भीमथडीच्या तटामधुनी. उसळे मज  नीर

दर्शना तुझीया आले देवा सत्यभामादेवी ,

रासलीला यमुनाजळी ,माझ्या तीरी वैष्णव मेळा,

कारे अव्हेर माझा केशवा,एकदा तरी यावे माझ्या तीरा,

करीन सेवा तुझि रे मी प्राणपणाने.

आकाडात वरुण कृपा करता,मज सव्रागा  भरती येते 

तूझ्या दर्शना आडवती मज तुझे हे वेडे. वैष्णव भक्त,

ही सारी रे तुझीच लीला,मी ओळखते तुझा कावा.

कितीतरी बांधणे घाला तरी नित्य कलशातूनी दर्शना

येईल माझे जल मंदिरा,

उतरतील त्या जळधारा,  तव अंगावरती  .

 स्नान घालूनी निर चालले, भूमातेच्या उदरी,

निरोप द्यायला निघाले श्रीहरीचा भीमेच्या तीरी 

असे अनोखे मिलन आपले सदैव राहावे सृष्टीमधे 

करावे मजला तृप्त नित्यनेमाने ,देवा नित्यनेमाने,


निशिकांत हारुगले



















































लावणी गीत

 

लावणी गीत...


घन घन. माला दाटली नभात,

टप टप टापा टाकीत आला

वरुणीराजा अंगणात.

मृग सरला अडद्रा गेली गेला पुनर्वसु,

पुष्याच्या पावसात चिंब चिंब भीजू.

रोप उगवून साळीची बाळसे धरावं आली ,

लागण कराव जमलो आम्ही मावळ पोरी.


आम्ही घाटोरी घाटोरी सह्याद्रीच्या मुली,

रोप लावीतो साळीची तांबड्या माती मधी.

कोकण  मुलखाचो  राजे वरूनी चालूनी आले ,

आले हो आले, कोकण मुलखाचो राजे,

त्याने धरील फेर आभाळ माथ्याले ,

थुई थुई पाणी रानात करायले.


बसव चाले रानात, लोणी घुसळे वावरात,

हिरवी सपानं दडल आमच्या मनात.

भाद्रपदात गवर रानात खेळुदे,

हिरव्या भाताची नागफणी रानात डोलू दे.


 नागफणी रानात रानात डोलेल,

रास धानाची धानाची खळ्यात रचेल.

महादेवाची देवाची कृपा होईल

आई लक्ष्मी लक्ष्मी कणगात भरेल.

 निशिकांत हारुगले



श्रीहरी विठ्ठल

  हरी हरी श्रीहरी पळाला कुठे श्रीहरी,

शोधती वैष्णव मंडळी, पंढरीच्या रणातूनी.


इथे शोधू  की तिथे शोधू , पंढरीच्या रायाला.

शिणोठा घालवाया देव गेला ,नंदवाळ नगराला,


रात्रीचे बारा वाजता, दाराची कडी गाजता  .

राई म्हणे रुक्मिणीला ,कोण ग पाहुणा  आला.


 दारी उभा विठ्ठल पाहून, हर्ष झाला मनाला .

सेवेशी सिद्ध जाहल्या, अष्टनायका.


रुक्मिणीने घातला पलंग, अंथरूण घातले राईन.

वारा घाले लुमावती, पावले चेपती जांबुवंती .


सेवा करत  चालली रातराणी सरत.

सोडायचा नाही नाथ आता, काहिकेल्या परत .


नंदवाळ नगरात, करवीर क्षेत्रात .

विसावा घेतो जगाचा जगन्नाथ .


पहाट समई धुंद गारवा सुटला.

साखरझोपेत गेल्या अष्टनायक .


पंढरीच्या रणातून पहाटे हाक आली विठ्ठला .

जगत राजा चालला पुन्हा वैष्णव भेटीला.


प्रभात समयी जाग आली अष्टनायका .

शोधा शोध घेत चालल्या चहू मुलखा .


रुक्मिणी काढे समजूत सर्व बायांची.

रात्री बारा वाजता कडी गाजेल परत दाराची .


निशिकांत हारुगले

विद्यादेवी

 कंठातूनी प्रकटले ओंकार स्वरुपात,

श्रीगणेशा करून करू तयाची सुरवात.


प्रकटले ते स्वर मंजुळ मुख कमलातून,

दंततालव्य वाजवीत जिव्हा करे साथ.


यावे शारदे स्वीकारावे माझ्या पूजेस,

आशीर्वाद देऊनी तारावे निज भक्तास.


करातील करंगळी करते वाकुनी तव  मुजरा,

तयावरती स्वार झाला मरंगळीचा फेरा ,


अंगठ्यासवे अनामिका तिज साथ मधल्याची ,

मोरपीस शोभते तयाचेया करी .


प्रकटली ताडपत्रावरती तू शारदादेवी .

बुध्दीदेवता  आदेश देते ती ब्रम्हस्वरूप ,

कसे सत्य चिरकाल टिकावे या विश्वात,


जाहले बंधिस्त श्रेष्ठ ज्ञान त्या ग्रंथात,

उघडताच पाने प्रकटावे  तत्पर  जगात  .


ज्ञानाच्या  गोणी लादाव्या पाठीवरी ,

तरुण जाऊ हा संसार मोह मायारुपी ,


तुझी साथ आम्हा असावी नित्यनेमाने,

सेवा  घडावी तुझी प्राणपणाने ,

घडो जीवनी जीवन ज्ञानाने .

निशिकांत हारुगले 

सागवेळू

 सागवेळूच्या बनात, करारती वेत.

गोडगुंजन भ्रमरांचे तळ्यातील कमळात.

वेड्या वाकड्या ओढ्याचे पाणी खळाळत गाजे.

तहानलेल्या झाडोय्रांना सुखावत चाले.

कापूस पिंजला अंबरी काळया पांढऱ्या मेघांचा,

खेळ चालला चालला श्रावणी उन पावसाचा .

हिरव्या गर्द झाडीतून गूज कोकीळ बोलतो,

मधूर कुहुकुहू गीत कानात पडते,

थुई थुई पावलांवर मुयुर नाचतो रानात,

रंगीबेरंगी पिसारा त्याच्या फुलतो अंगात,

गोल रिंगनाच्या तळ्याच् नीळ नीळ पाणी,

मासोळ्यांचा खेळ रंगला लपाछपीचा जळी.

फुले नाजूक नाजूक सुंदर साजिरी फुलली, 

तयांचा मकरंद मधमाशी हळूच पळवती .

झूळूक वाऱ्याची गाते घुम घूम गीत , 

कसे वाद्यांविन वाजे निसर्गाचे संगीत. 

अशा सुंदर श्रावणात फिर फिरावेसे वाटते ,

सह्याद्रीच्या कुशीत निज निजावेसे वाटतें.


निशिकांत हारुगले



प्रणय गीत

 प्रणय गीत

झिम्माड पाऊस चिंब भिजवून शहारे आणि अंगा,

आठवण येते तुझी साजना या श्रावण दिवसा.

म्हणूनच आलो तुझ ओढीने भेटाया साजणी,

उनपावसाच्या सरीत जाऊ चिंब भिजूनी.


टप टप वाजूनी टपोरे थेंब काय सांगती बोलणं,

तुझ्या नि माझ्या प्रीतिसंगम भेटीचे मधुर गीत असेना.

फुलवून पिसारा मयुर नाचतो रानावनातून,

तयास पाहून शिरशिरी भरते लांडोरीस लाजून.


पावलातील नुपूर सांगती अनुरागाचे गीत,

त्या गीताच्या तालावर ती हृदय माझे डोलल.

कोगुळ बोले कुहूकुहू काय सांगतो कानात,

तुझ्या नि माझ्या मिलनाचा आला सोनेरी हा क्षण.


नजर भिडता नजरेस भिजल्या देहाची आरपार,

असा क्षण ना पुन्हा सखये जवळी ये लाजून.

गर्जून सांगे मेघराज मज पाऊले टाक तू जपूनी,

घाबरु नको सखये साजणी वरीतो आज तुला मी.


असे अनोखे मिलन झाले अशा कोणत्या क्षणी,

आकाशातून टाके मंगल अक्षता पानकळा डोईवरी.

असेच प्रेम करशील सखया मजसवे जीवनात,

म्हणूनच अर्धांगी करून नेईतो  मी घरास.

 कवी- निशिकांत हारुगले

साजण येती घरा

 साजण ऐती घरा.


फुलला पलाश या चैताच्या मासी,

सांगतो आकर्षून आला वसंत घरी.

गुढ्या तोरणाच्या सणात, दारी सुंदर रांगोळी,


शृंगार करुनिया नार उभी या दारी.

भरल्या गोकुळात सौख्य नांदावे घरी.


देखण्या अबोलीचा गजरा माळून शिरी,

वेणी बांधते हसून आरशात पाहुनी.


ती नाजूक चरणे घुटमळत दारी होती.

वाट पाहते कोणाची, येईल सांगा कोणी?


गूज कोगुळ गातो, बोलून सांगे निरोप.

येईल साजण तुझा, आज तुझला भेटायला.


दारी येता घरधनी, दूर देशाहून परत.

पाहता होते तृप्त, आज आसुसलेले मन.


तुम्हा पाहता लोचने झाली तृप्त,

काळजाच्या स्पंदनानी केले हसून स्मित.


नको सोने नाणे मज, नको सुंदर पैठणी.

तुम्हा पाहता सखया, वाटे स्वर्ग आला घरी.


आज पाडव्याच्या दिवशी, करते पुरणपोळी,

कडू गोड आठवणींचे,  सौख्य नांदावे या घरी.

निशिकांत हारुगले 

पतंग मैत्री

  तुझे पाय लागले आभाळी, मी नाचतो धरणीवरी. किती घेशील गरगर गिरक्या, तुझी वेसण  माझ्या करी. तूच माझा अबोल सखा , बालपणीचा साथीदार. वाटले तुझ्या...