लावणी गीत...
घन घन. माला दाटली नभात,
टप टप टापा टाकीत आला
वरुणीराजा अंगणात.
मृग सरला अडद्रा गेली गेला पुनर्वसु,
पुष्याच्या पावसात चिंब चिंब भीजू.
रोप उगवून साळीची बाळसे धरावं आली ,
लागण कराव जमलो आम्ही मावळ पोरी.
आम्ही घाटोरी घाटोरी सह्याद्रीच्या मुली,
रोप लावीतो साळीची तांबड्या माती मधी.
कोकण मुलखाचो राजे वरूनी चालूनी आले ,
आले हो आले, कोकण मुलखाचो राजे,
त्याने धरील फेर आभाळ माथ्याले ,
थुई थुई पाणी रानात करायले.
बसव चाले रानात, लोणी घुसळे वावरात,
हिरवी सपानं दडल आमच्या मनात.
भाद्रपदात गवर रानात खेळुदे,
हिरव्या भाताची नागफणी रानात डोलू दे.
नागफणी रानात रानात डोलेल,
रास धानाची धानाची खळ्यात रचेल.
महादेवाची देवाची कृपा होईल
आई लक्ष्मी लक्ष्मी कणगात भरेल.
निशिकांत हारुगले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा